जिल्हाशिक्षणसामाजिक

डॉ. एम. एस. स्वामिनाथन जयंतीनिमित्त ‘शाश्वत शेती दिन’ साजरा; सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून अन्नसुरक्षित भारत घडवण्याचा निर्धार…

पुणे (हवेली) : “भारताला गरिबीमधून बाहेर काढायचे असेल, तर डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे विचार आणि शिफारसी भारत सरकारने अंगीकारल्या पाहिजेत. भारत कृषिप्रधान देश असून रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास अन्नधान्य उत्पादनात वाढ होईल आणि भारतातील एकही व्यक्ती भुकेने मरणार नाही,” असे प्रतिपादन प्रा. सतीश कुदळे यांनी केले.

समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय, लोणी काळभोर येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘शाश्वत शेती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना प्रा. कुदळे यांनी अन्न सुरक्षा, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण भारताच्या समृद्धीसाठी आवश्यक उपायांवर भाष्य केले. त्यांनी डॉ. रंगनाथस्वामी यांच्या विचारांची आठवण करून दिली आणि त्यांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी भूषवले. ते म्हणाले, “शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. भविष्यात शेती स्त्रियांच्या हाती गेल्यास भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. सध्या शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असून डॉ. स्वामीनाथन यांच्या विचारांचा अवलंब केल्यास शेतकरी आत्महत्या रोखता येतील.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजयकुमार घोडके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश गाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शेखर पाटील यांनी केले.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल ग्रामीण विकासासाठी आशादायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??