जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मोठी बातमी! आता १ वर्षानंतरचे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय…

हे पाऊल उचलून शासनाने बनावट दाखले व अनियमिततेला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे

मुंबई : महाराष्ट्र शासनाने जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या १२ मार्च २०२५ च्या निर्णयानुसार आता एक वर्षानंतर मिळालेली जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

शासनाच्या निदर्शनास आलं की, तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अधिकार कक्षेबाहेर जाऊन जन्म-मृत्यू दाखले दिले आहेत. त्यामुळे अनेक बनावट प्रमाणपत्रे तयार झाल्याचा संशय निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पाऊल उचलत नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे.

नवीन नियम काय?

🔹 जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर २१ दिवसांत अर्ज करणं बंधनकारक आहे.
🔹 जर एका वर्षानंतर अर्ज केला, तर ते प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही.
🔹 अशा प्रमाणपत्रांना सरळ रद्द करण्यात येईल.
🔹 जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा अधिकार फक्त जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडेच असेल.
🔹 तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेली प्रमाणपत्रे अवैध ठरवली जातील.
🔹 अर्जदारांनी आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून पडताळणी करून घ्यावी लागेल.

केंद्र सरकारची सुधारणा…

केंद्र सरकारने १९६९ च्या जन्म-मृत्यू अधिनियमानुसार सुधारणा केली आहे. या सुधारित अधिनियमानुसार विलंबित दाखले देण्याचे काम केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी काय करावं?

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी योग्य वेळेत अर्ज करावा. उशीर झाल्यास ‌जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांच्या परवानगीशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही. अन्यथा तुमचं प्रमाणपत्र रद्द ठरेल.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??