
पुणे (हवेली) : पुणे सोलापूर रोडवर वसलेले पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती मोठ्या संख्येने लोकवस्ती व व्यवसायात प्रगतीपथावर असलेले गाव म्हणून प्रचलित..
कदमवाकवस्ती येथील नागरिक शासनाच्या भूसंपादनाच्या मनमानी कारभारा विरोधात कदमवाकवस्ती येथे एकवटली असता या बैठकीत विकासासाठी आमचा कोणाचाही शासनाला विरोध नाही. रिंगरोड करण्यासाठी लागेल, तेवढ्या आमच्या जमिनी घ्या. पण मोबदला मात्र दोन अडीच पटीने नव्हे, तर रेडी रेकनरच्या पाच पटीने मिळाला पाहिजे, असे स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाकडे यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी भूमिका घेतली.
प्रारुप विकास योजनेतील ६५ मीटर रुंद रस्त्यासाठी सन २०१५ च्या नवीन भूसंपादन अधिनियमाव्दारे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करावयाच्या जमीनीच्या भूसंपादन या प्रस्तावासंदर्भात कदमवाकवस्ती येथील ग्रामपंचायतीच्या मैदानात प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये प्राथमिक बैठक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पार पडली.
यावेळी पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अव्वल कारकून विद्या गायकवाड, सुरेखा काकडे, एकनाथ ढाके, मंडलाधिकारी योगिता गायकवाड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता अरविंद माळी, वरिष्ठ अभियंता अमित हस्ते, तहसीलदार आशा होळकर, पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे निरीक्षक जयसिंग गाडे, लिपिक रोहित चोपडे, भूकरमापक स्नेहा भिसे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुणे रिंग रोड हा ६५ मीटरचा असून बावडी, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती येथील रिव्हर व्ह्यू सिटीच्या जवळून पिराच्या मंदिरापासून फुरसुंगी व पुढे वडकीच्या दिशेने जाणार आहे. या रिंगरोडमध्ये कदमवाकवस्ती येथील शेकडो शेतकऱ्यांची अंदाजे जवळपास १६ ते १७ एकर जमीन (67581.54 चौ. मी.) या रस्त्यामध्ये जाणार आहे.
पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे पुढे म्हणाले की…
वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येत आहे. यामध्ये कदमवाकवस्ती येथील अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र जात आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकहित व विकासासाठी क्षेत्र देऊन सहकार्य करावे. तसेच या क्षेत्राच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला देण्यात येणार आहे, असेही पांढरे यांनी सांगितले.
स्थानिक शेतकरी व नागरिक आक्रमक…
पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांच्या या प्रतिउत्तराला अनेक शेतकरी नाराजी दाखवत शेतकरी आक्रमक झाले.
शेतकरी गणपत चावट पुढे म्हणाले…
यावेळी बोलताना शेतकरी गणपत चावट म्हणाले की, क्षेत्र देण्यासाठी आमची काहीही अडचण नाही. पण रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला आम्हास मान्य नाही. जर शासनाने रेडी रेकनरच्या ५ पटीने मोबदला दिला, तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ. अन्यथा आम्ही जमिनी देणार नाहीत. तसेच रिंगरोडचे सर्कल रद्द केले तर व्यावसायिकांची दुकाने व शेतकऱ्यांची घरे वाचतील.
शेतकरी यांचा शासनाच्या प्रतिनिधी याना प्रश्न…
दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरण, रिंग रोड, शिवरस्ता याबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांन पुढे मांडल्या, काही शेतकऱ्यांचे क्षेत्र रिंग रोडमध्ये गेले असून त्यांचे या यादीत नावे नाहीत. मग त्यां शेतकरी यांना मोबदला मिळणार का? अशी भुमिका मांडल्यावर पीएमआरडीए व भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांनी सूचनांची नोंद करून घेतली.
कदमवाकवस्ती येथील गावकरी एकवटले…
यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, उद्योजक बाळासाहेब भोसले, गणपत चावट, चित्तरंजन गायकवाड, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, उदय काळभोर, सुशील काळभोर, तुषार काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामसेवक अमोल घोळवे, शेतकरी व व्यवसायीक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.



