कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

हवेलीचा ‘पाणंद-शेतरस्ता’ पॅटर्न राज्यभर ; लोणीकंदमध्ये महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा…

हवेली : शेतकऱ्यांच्या पाणंद व शेतरस्त्यांच्या दीर्घकालीन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हवेली तालुक्यात राबविण्यात आलेला अभिनव ‘पाणंद-शेतरस्ता’ पॅटर्न आता राज्यभर लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी लोणीकंद येथे केली. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकाराचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

लोणीकंद (ता. हवेली) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद व शेत रस्ता’ योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेणे बंधनकारक केल्यामुळे गावपातळीवरच शेतरस्त्यांचे प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पाणंद मार्ग आणि शेतरस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे.

या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

महाराजस्व अभियान’ अंतर्गत राज्यभर मोठ्या प्रमाणावर महसूल सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे सांगताना बावनकुळे यांनी माहिती दिली की, पहिल्या टप्प्यात ४० हजार फेरफार दुरुस्ती, २० हजार सातबारा दुरुस्ती, १ लाख ५० हजार संगणकीकृत सातबाऱ्यांचे वाटप, ७५ हजार ‘८ अ’ नोंदी, १ लाख ७५ हजार विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच ‘एक खिडकी’ योजनेअंतर्गत ३४ हजार प्रमाणपत्रे देण्यात आली असून ५०० गावांतील दस्तऐवज दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. सुमारे ५ लाख कुटुंबांना या शिबिराचा लाभ झाला असून, पुणे जिल्ह्यात १३ हजार ३३ दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे.

हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल युवराज काकडे यांच्या संकल्पनेचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, ग्रामसभांच्या माध्यमातून पाणंद व शेतरस्त्यांवरील अडथळे दूर होऊन स्थानिक पातळीवरच वाद मिटविणे शक्य होईल.

दरम्यान, हवेली तालुक्यात सुमारे १६०० मोजणी प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब समोर आली. यावर नाराजी व्यक्त करत बावनकुळे यांनी ही सर्व प्रकरणे अवघ्या १५ दिवसांत निकाली काढण्याचे आदेश दिले. “लोकाभिमुख सरकारसाठी नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रदीप कंद यांनीही हवेली तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची कामे वेगाने सुरू असल्याचे सांगितले. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतरस्त्यांचा प्रश्न सुटणार?

हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणंद, शिवरस्ते आणि शेतरस्ते अतिक्रमणामुळे अडथळ्यात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वारंवार वाद निर्माण होत होते. मात्र, आता ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागामुळे हे रस्ते लवकरच मोकळे होण्याची शक्यता व्यक्त होत असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??