क्राईम न्युज

फायनान्स कंपनीचा कारनामा ; घर गहाण ठेवूनही कर्ज देण्यास नकार.. फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या;

सुनिल थोरात (प्रतिनिधी)
पुणे (शिरुर) : तळेगाव ढमढेरे येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हरिभाऊ गायकवाड (वय-५३) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाराष्ट्रातील फायनान्स कंपनी ग्राहकाला नाहक त्रास देत असतात. असे कितेक उदाहरण ताजे असताना तळेगाव ढमढेरे येथील एका व्यक्तीने आत्महत्या केली.
            फायनान्स कंपनीने कर्जासाठी हरिभाऊ गायकवाड यांच. राहत घर गहाण ठेवून घेतले. कर्ज मंजूर न करता सुरवातीचे हप्ते भरून घेतले. मात्र, कर्ज दिले नाही. कर्ज न देता फायनान्स कंपनीने अक्षरशा दमदाटीच्या जोरावर काही हफ्ते गुंडगिरी प्रमाणे हरिभाऊ गायकवाड यांच्या कडुन वसुल ही केले.
         या प्रकरणी महिंद्रा फायनान्स कंपनीच्या दोघांविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज दिलीप पवार आणि महेंद्र पाटील अशी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींचे नाव आहेत. याबाबत शीतल गायकवाड (वय-४३) यांनी फिर्याद दिली आहे.
            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे येथील हरिभाऊ गायकवाड यांना व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असल्याने त्यांनी शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीमध्ये सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फायनान्स कंपनीला (माॅरगेज) म्हणून घराचे कागदपत्र देत घराचे गहाणखत फायनान्स कंपनीच्या नावावर करून दिले. त्यानंतर कंपनीने त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून काही हप्तेदेखील भरण्यास सांगितले. परंतु कर्जाच्या रकमेचा चेक हरिभाऊ गायकवाड यांना दिला गेला नाही. त्यानंतर ते वेळोवेळी फायनान्स कंपनीत गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. हरिभाऊ गायकवाड यांना पुणे येथील कार्यालयात बोलावून घेऊन कर्ज देणार नाही आणि घराचे ही गहाणखत बदलणार नाही, अशी धमकीही दिली. यातूनच हरिभाऊ गायकवाड यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
           याप्रकरणी पोलिसांनी सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??