जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

महापालिका निवडणुकीची संभाव्य तारीख जाहीर होणार ; १५ ते १७ डिसेंबरदरम्यान घोषणा अपेक्षित…

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेवरून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण निवडणूक कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील आरक्षणाच्या घोळामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या असताना, आता महापालिका निवडणुकीचा धुरळा सर्वप्रथम उडणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे संकेत आहेत.

आरक्षण मर्यादा न पाळल्यामुळे वेळापत्रक बदलणार…

राज्यातील ३२ पैकी तब्बल १७ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला कडक शब्दांत बजावले की, मर्यादा ओलांडून निवडणुका घेता येणार नाहीत. परिणामी, १७ जिल्हा परिषदा मागे ठेवून उर्वरित १५ जिल्हा परिषदांची निवडणूक घेता येणार नसल्याने आयोगाने महापालिका निवडणुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिकांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली असल्याने, राज्यातील इतर बहुतांश महापालिका डिसेंबरमध्येच मतदानाला जाऊ शकतात.

१५ ते १७ डिसेंबरदरम्यान होऊ शकते घोषणा…

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी १० डिसेंबर रोजी वार्डनिहाय मतदार यादी अंतिम होणार आहे. आयोग त्याचा आढावा घेतल्यानंतर तीन ते चार दिवसांत निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार आहे. आयोगातील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीप्रमाणे:

➡️ महापालिका निवडणूक घोषणा – १५ ते १७ डिसेंबर दरम्यान
➡️ निवडणूक कालावधी – १५ डिसेंबर ते १० जानेवारी

सध्याच्या स्थितीत आयोगाकडे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका घेण्यासाठी फक्त ५० ते ५२ दिवसांचा कालावधी उरला आहे.

कोणत्या निवडणुका कधी? अंदाजे वेळापत्रक…

👉🏻नगरपरिषद व नगर पंचायत निकाल – २१ डिसेंबर
👉🏻महापालिका निवडणुका – १५ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान
👉🏻जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका – ५ ते ३१ जानेवारी

राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक बदलाच्या टप्प्यावर असताना, महापालिका निवडणुकांची घोषणा आता अगदी दारात आली आहे. पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??