जिल्हाराजकीयसामाजिक

नुकसान भरपाईसाठी कदमवाकवस्तीतील संताप, १३ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा ; राजेश्री उदय काळभोर…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने कदमवाकवस्ती परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्या राजेश्री उदय काळभोर यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदन देत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच १३ एप्रिल २०२६ पासून अप्पर तहसील कार्यालय, लोणी काळभोर समोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनानुसार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कदमवाकवस्तीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य, कपडे, फर्निचर व इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. या घटनेनंतर ग्रामपंचायतीकडून तत्काळ पंचनामे करून ते ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते.

मात्र, त्यानंतरच्या प्रशासकीय प्रक्रियेत मोठ्या त्रुटी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंतिम नुकसानग्रस्तांच्या यादीत अनेक पात्र नागरिकांची नावे वगळण्यात आली, तर काही पंचनामे जाणूनबुजून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेच गेले नाहीत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परिणामी, प्रत्यक्ष नुकसान सहन करूनही अनेक नागरिक व शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

याबाबत संबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांची पुनर्तपासणी करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ठाम भूमिका ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास १३ एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढणार असून स्थानिक नागरिकांचे लक्ष या प्रश्नाकडे लागले आहे.

या निवेदनाच्या प्रती राजेश्री उदय काळभोर यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार लोणी काळभोर तसेच पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या असून आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??